आदर्श पतसंस्थेच्या रामराज शाखेचे उदघाटन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आदर्श पतसंस्थेमध्ये ठेविदारांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेली पुंजी ही कधीही बुडणार नाही, अशी ग्वाही पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. अलिबाग तालुक्यातील रामराज येथे आदर्शची शाखा सुरु करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ही आदर्शची 14 वी शाखा आहे.
कोकण विभागाच सेवानिवृत्त मुख्य लेखाधिकारी रामराजचे सुपुत्र भगवान नारायण वेटकोळी यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तर सरपंच हिराचंद काष्टे यांच्या हस्ते मिनी एटीएमचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कैलास जगे, संचालक विजय पटेल, अनंत म्हात्रे, जगदीश पाटील, विलाप सरतांडेल, अभिजित पाटील, सीईओ मीनाक्षी पाटील, राज्याचे मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रेय नारायण वेटकोळी, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वेटकोळी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेश पाटील यांनी ग्रामीण भागातील जनतेला बचतीची सवय लागावी व तळागाळातील लहान व्यवसायिकांना व गरीब मोलमजुरी करणार्यांना लहान उद्योग करण्यात हातभार लागावा, म्हणून आदर्शच्या शाखा ग्रामीण भागात सुरू केल्या असल्याचे नमूद केले.
पतसंस्थेचा कारभार आदर्शच आहे. ही पतसंस्था चांगल्या सुविधा देते. उत्तम सेवा देते. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. त्यामुळे ग्राहकांनी ठेवी ठेवाव्यात, असे आवाहन दत्तात्रय वेटकोळी यांनी यावेळी उपस्थितांना केले. उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
आदर्श पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. त्यामुळे पतसंस्थेत ठेवलेला पैसा बुडणार नाही. येथील छोट्या व्यापार्यांना सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. रामराज भागातील 100 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत करून दिले जाईल.
सुरेश पाटील
अध्यक्ष, आदर्श पतसंस्था