महाड जवळ कारला अपघात

पाचजण गंभीर जखमी

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यांतील वहूर गावाच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर मंगळवारी संध्याकाळी इर्टीगा कारला झालेल्या अपघाता मध्ये एकाच कुटूंबातील पाचजण जखमी झाले आहेंत.कार मुंबई हून बिरवाडी गावा कडे जात असताना अपघात झाला. इर्टिगा कार क्रमांक एमएच-05/सीव्ही-934 ही कार वहूर गावाच्या हद्दीत आल्या नंतर अचानक मोटार सायकलस्वार कार समोर आल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना कारला अपघात झाला.या अपघाता मध्ये एकाच कुटूंबातील पाच जण जखमी झाले असुन मंगल सुरेश पालांडे वय 60,रणजित सुरेश पालांडे वय 38,स्वाती रणजित पालांडे वय 37, अलिय रणजित पालांडे वय 6 आणि रुपेश सुरेश पालांडे वय 36 याचा जखमी मध्ये समावेश आहे.जखमींवर महाड ग्रामिण रुग्णालयामध्ये उपचार करंण्यांत आले.

Exit mobile version