धरणात गाडी गेली वाहून; एकाच मृत्यू, एक बेपत्ता

| पालघर | प्रतिनिधी |

तानसा धरणाखाली शनिवारी (दि.3) गटारीच्या पार्टीसाठी आलेले पाचजण गाडी सह तानसा नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात तीन जणांनी बाहेर उडी मारल्याने ते बचावले. मात्र, दोन जण गाडीत अडकले होते. यापैकी एकाचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. तर, एकजण अद्यापही बेपत्ता आहे.

शनिवारी पाच मित्र तानसा धरणाच्या गेट नंबर एकच्या खाली गाडीत बसून पार्टी करत होते. यावेळी अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आणि पाच जण गाडीसह नदीच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी तिघांनी बाहेर उड्या मारल्याने ते बचावले. मात्र, दोन जण गाडीतच अडकले होते. यात गणपत चिमाजी शेलकंदे (रा.कल्याण) याचा गुदमरून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. मात्र, एकजण उद्याप बेपत्ता आहे.

Exit mobile version