| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ममदापुर गावाच्या हद्दीतील 30 गुंठे जमिनीची विक्री बोगस विक्री प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये चौघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन प्रकरणी न्यायालयात जमिनीचे मूळ मालक यांनी दाद मागितली होती.त्यानंतर त्या जमिनीचा न्यायालयात खटला सुरु असताना पुन्हा 2021 मध्ये विकण्यात आली आणि त्याबद्दल जमीनीची खरेदी करणार्या व्यक्तीकडून न्यायालयात दाद मागण्यात आली आहे होती. दरम्यान, त्याबद्दल न्यायालयाने नेरळ पोलीस ठाणे यांना आदेश देऊन संबंधित चार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
ममदापूर गावातील सर्वे नंबर 175/45,175/46,175/47,175/48 ही जमीन त्या जमिनीचे मूळ मालक मधुकर महादेव प्रधान, चंद्रकांत महादेव प्रधान, रामचंद्र महादेव प्रधान यांचे नावे होती.सदर जमिनीचे मूळ मालक यांच्या ऐवजी बनावट व्यक्ती यांच्या माध्यमातून त्या जमिनीची विक्री करुन गणेश अनंत घारे याने त्या जमिनीची मालकी मिळविली.त्याबद्दल माहिती मिळताच प्रधान यांनी 2016 मध्ये पनवेल येथील न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी पनवेल येथील न्यायालयाने निर्णय देताना नायालयाचा निर्णय होत नाही तोवर जमिनीची अन्य कोणालाही विक्री करू नये असे आदेश गणेश अनंत घारे यांना दिले होते. मात्र त्या जमिनीची विक्री मूळ मालक प्रसाद रामचनद्र प्रधान,मधुकर महादेव प्रधान,चंद्रकांत महादेव प्रधान यांनी जमिनीचे खरेदी करणारा गणेश घारे या सर्वांनी न्यायालयाचे आदेश असताना संगनमत करून जमिनीची विक्री केली.
2021 मध्ये हा जमीन व्यवहार करताना पनवेल न्यायालयाचे आदेश उल्लंघन करण्यात आले असताना जमिनीची खरेदी करणारे उल्हासनगर येथील सुरेश आसनदास मंगलानी यांनी सदर जमीन सव्वा कोटी रुपयांना खरेदी केली होती.मात्र सातबारा उतारा आपल्या नावे होत नसल्याने मंगलानी यांनी पनवेल न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी याच जमिनीचा दावा अनेक वर्षे प्रलंबित असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले.त्यानंतर निर्णय देताना गणेश अनंत घारे,प्रसाद रामचंद्र प्रधान,मधुकर महादेव प्रधान,चंद्रकांत महादेव प्रधान या सर्वांवर नयायलायचे आदेश मोडल्याबद्दल आणि न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच तिसर्या व्यक्तीला जमीन विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नेरळ पोलीस ठाणे यांना दिले.त्यानुसार नेरळ पोलीस ठाणे येथे सदर गुन्हा 287/2022 नुसार नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास आणि न्यायालयाच्या आदेशाने कारवाई नेरळ पोलीस ठाणे करणार आहे. पोलीस उपनिरीक्षक गिरीश भालचिम अधिक तपास करीत आहेत.