आधुनीकी युगात बदल घडवणे काळाची गरज
| तळा | वार्ताहर |
हिंदु धर्मात हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीपौर्णिमा वर्षातील शेवटचा सण या सणालाअंत्यत महत्त्व आहे. आपल्या जीवनात भौतिक सुखाच्या मागे लागून अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालल्या असून विशेषतः तरूण पिढींंमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आहे. त्यामुळे धर्मसंस्कार संस्कृती लोप पावली जात आहे. वाईट अपप्रवृत्तीचा नाश या हुताशनी पौर्णिमेला होळीत विसर्जन करणे असे आध्यात्म व पुराणात सांगितले आहे. आजच्या समाजाला खरी गरज आहे. मोठ्या होळीला मोठ मोठी झाडे तोडून होळीत जाळली जातात त्यामुळे जंगल संपत्तीचा र्हास होत आहे. निसर्गाची ही मोठी हानी होते याची जाणीव नाही. सरकार वृक्ष लागवड व संगोपन करण्यासाठी मोठे उपक्रम राबवून लागवड केली जाते. यामध्ये सामाजिक संस्था, शाळा कॉलेजमधून जनजागृती केली जाते. पर्यावरणच्या दुष्टिनेविचार करीत नाही याचा समाज जीवनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे.
दुर्गुणाची आहूती म्हणजे मनात साठलेला मळकाम, क्रोध, लोभ, मोह, मत्सररूपी दुर्गुण होळीत व धुलीवंदनात आकाशात भिरकावून देऊन जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण आहे. परंतु, या रंगपंचमीचे बाजारीकरण झालेले जिकडे तिकडे पहायला मिळते. नैसर्गिक रंगाची ऊधळण थांबली आहे.