26 जनावरे मृत्यूमुखी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आपर्यंत जिल्ह्यात दरडप्रवण तसेच पूरप्रवण गावांमधून 822 कुटूंबातील 2 हजार 405 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यातील 223 कुटूंबातील 844 व्यक्ती त्यांच्या नातेवाईकांकडे तर 22 कॅम्पमध्ये 599 कुटूंबातील 1 हजार 561 व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 4 पक्की तर 9 कच्ची घरे पुर्णतः पडली आहेत. तसेच 39 पक्की तर 48 कच्ची घरे अंशतः पडली आहेत. 8 झोपड्यांची पडझड झाली आहे. तर 4 गोठे पुर्णतः आणि 17 गोठे अंशतः बाधीत झाले आहेत. 5 मोठे जनावर तर 21 लहान जनावरे यात मृत्यूमुखी पडली आहेत. 9 सार्वजनिक मालमत्तांची नुकसान झाले आहे.
रायगड जिल्ह्यात दिनांक 13 जुलै 2022 रोजी 73.01 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस माथेरान येथे 27.00 मिमी आहे. दिनांक 13 जुलै2022 रोजी अहवालानुसार, अंबा, कुंडलिका व पाताळगंगा नदी वगळता इतर 3 नद्यांची सद्याची पाणी पातळी इशारा पाळीपेक्षा कमी आहे. अंबा नदीची सद्याची पातळी 8.95 मी, कुंडलिका नदीची सद्याची पातळी 23.40 मी. तर पाताळगंगा नदीची सद्याची पातळी 21.30 मी आहे.
जिल्हयातील प्रमुख रस्ते रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु आहे. कुंडलिका नदीची पातळी वाढल्याने रोहा-अष्टमी गावाना जोडणारा जुना पुल वाहतुकीस बंद केला आहे. पर्यायी वाहतुक नविन पुलावरून सुरु आहे. खालापूर तालुक्यातील खोपोली-पाली रस्त्यावर तुकसई गावाकडे जाणार्या छोटया नदीचे पाणी आल्याने सदर पुलावरील वाहतुक बंद केली आहे. कर्जत तालुक्यातील मौजे दहिवली तर्फे वरेडी नेरळ कळंब येथील उल्हास नदीवरील पुलाला पाणी लागत असल्याने सदरचा रस्ता वाहतुकीसाठी व नागरीकांना ये- जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे. कर्जत वावे बेणसे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकीस रस्ता बंद केला आहे. सुधागड पाली तालुक्यातील जांभूळपाडा ते कळंब रस्ता पाणी वाढल्यामुळे बंद केला आहे. सुधागड पाली तालुक्यातील पाली-खोपोली रस्त्यावरील तिवरे गावाजवळच्या पुलावरील वाहतूक एक बाजूंनी बंद करण्यात आहे आहे. सुधागड अंबा नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे वाकण पाली वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा कोलाड भिरा रोड कुठली येथे झाड पडल्याने वाहतूक बंद पडली आहे. खालापूर तालुक्यातील मौजे कलोते मोकाशी मधील मुंबई पुणे हायवे ते कलोते आदीवासीवाडी रोडवरील छोटा पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. गावातुन जाण. येणेयासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. जिल्ह्यातील एकूण 25 धरणापैकी 17 धरण पूर्ण क्षमतेने भरले असून विसर्ग सुरु आहे.