पन्नास थर लावून राजकीय हंडी फोडली; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

। ठाणे । प्रतिनिधी ।
गोपाळकाला उत्सवात गोविंदा थर लावून हंडी फोडतात. दोन महिन्यापूर्वी आम्ही पन्नास थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. ठाणे येथील टेंभी नाका येथे शुक्रवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.

पुढच्या वर्षी होणार प्रो गोविंदा
स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना ? अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. सरकारने गोविंदाना विमा दिला आहे. सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होती, ती मान्य करण्यात आली आहे. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये, याची काळजी घ्या. प्रो कबडीप्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाण्याचा सीएम व्हावा हे स्वप्न
आनंद दिघे यांनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम त्यांनी केले. ठाण्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे. त्यांच्या बहिणीनेसुद्धा हेच सांगितले होते. त्यांची एवढी दूरदृष्टी होती आणि त्यांचे स्वप्न आज पूर्ण केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

बाळासाहेव ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले आहे. तसेच यापुढे हे थर वाढत जाणार आहेत. गोविंदाप्रमाणे पुढील उत्सव साजरा करताना मोठ्या उत्साहात व काळजी घेऊन साजरे करा.

एकनाथ शिंदे.मुख्यमंत्री


Exit mobile version