| नागोठणे | वार्ताहर |
आपले घर ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणेच आपला परिसर, आपले गाव स्वच्छ, नीटनेटके ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन राजिपच्या जिल्हा स्वच्छता कक्षाचे व्यवस्थापक जयंत गायकवाड यांनी केले.
रायगड जिल्हा परिषदेचा स्वच्छता विभाग, रोहा पंचायत समिती यांच्या सहकार्याने नागोठणे ग्रामपंचायतीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयात शनिवारी (दि.5) सकाळी संपन्न झालेल्या घनकचर्याचे व्यवस्थापन, कचर्याचे वर्गीकरण व मार्गदर्शन कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते.
यावेळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच रंजना राऊत, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, घनकचरा व्यवस्थापनाचे मार्गदर्शक अरविंद वाणी, कैलास टिळेकर, रोहा पं.स.चे रत्नदीप चावरेकर, नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, ग्रा.पं. सदस्य अतुल काळे, ग्रा.पं. सदस्या माधवी महाडिक, कल्पना टेमकर, मेघना कोळी, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समितीचे अध्यक्ष कीर्तिकुमार कळस, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अनिल गिते, जोगेश्वरी माता उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन राऊत, यशवंत चित्रे, सुनील लाड, विठ्ठलतात्या खंडागळे, प्रा डॉ. श्रीकृष्ण तुपारे, नागोठणे संत सेवा मंडळ अध्यक्ष रतन हेंडे, सुदर्शन कोटकर, दीपिका गायकवाड, प्रतिभा तेरडे, राजश्री टेमकर आदींसह विविध मंडळांचे अध्यक्ष, बचत गटांच्या अध्यक्षा व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी कैलास टिळेकर व अरविंद वाणी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा प्रारंभ ‘हीच आमची प्रार्थना! माणसाने माणसाशी माणसासम वागणे!’ या प्रार्थनेने झाला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहन दिवकर यांनी केले.