| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार मीनल दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी “माझी वसुंधरा अभियान “अंतर्गत मौजे किहीम ता. अलिबाग येथील समुद्र किनारा सफाई मोहीम आयोजित केली होती. या मोहीमेत किहीम गावातील प्रतिष्ठित नागरीक व ग्रामपंचायत कर्मचारी , महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ. हुलवान व सदस्य, रोटरी क्लब, अलिबागचे सदस्य सहभागी होते. विशेष म्हणजे या मोहिमेत किहीम समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांनी सहभागी होऊन स्वच्छता केली. मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी किहीमचे मंडळ अधिकारी श्री. पाटील यांच्यासह तलाठी श्री. शिंगाडे, श्री. इग्रुळकर श्री. हांगे, श्री. घुमरे तसेच कोतवल, पोलीस पाटील यांनी विशेष कष्ट घेतले.