। गुहागर । प्रतिनिधी ।
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-दोन अंतर्गत गुहागर तालुक्यात ‘आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या अभियानाचा शुभारंभ मुंढर-कातकरी येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते करण्यात आला.
मुंढर-कातकरी येथे या अभियानांतर्गत घनकचरा विलिगीकरण शेड बांधकामाची पाहणीसुद्धा गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केली आहे. यावेळी माजी कृषी विस्तार अधिकारी यांनी नॅडेप कंपोस्ट खत खड्डा भरण्याबाबत प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, मुंढर सरपंच अमिषा गमरे, सदस्य प्रणिता रामाने, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, स्वच्छ भारत मिशनचे सर्वेश साळवी, माजी उपसरपंच अजित गमरे, मुख्याध्यापक दशरथ कदम, उपशिक्षक पवार आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.