परिसराची साफसफाई करुन कचर्याची विल्हेवाट
। पोलादपूर । वार्ताहर ।
माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्रतर्फे 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत पोयनाड येथील बाजारपेठ तलावामध्ये पडलेला भरपूर कचरा, निर्माल्य व आजूबाजूच्या परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आले.
यासाठी माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर अलिबाग व नवकला कृती फाऊंडेशन रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आज निर्मल गणेशोत्सव कार्यक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. किरण पाटील यांच्या आवाहनानंतर माणुसकी टीम तसेच रायगड जिल्ह्यातील बरेच अशा संस्था निर्मल गणेशोत्सव साजरा करत आहेत, तर त्यापैकी एक हा कार्यक्रम आहे. यामध्ये स्वच्छता व आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून बरेचसे कार्यक्रम राबवण्यात आले.
माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान व नवकला कृती फाऊंडेशन रायगडचे देवेंद्र केळुसकर यांच्या पुढाकाराने शनिवारी पोयनाड येथील बाजारपेठ तलावाच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेकडून जयवंत गायकवाड भेट देऊन सीईओ डॉ. किरण पाटील व डेप्युटी सीईओ डॉ. ज्ञानदा फणसे यांच्यातर्फे योग्य ते मार्गदर्शन करून तसेच श्रमदानात हातभार लावून पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या श्रमदानास माणुसकी कार्यकारी अध्यक्ष तानाजी आगलावे, उपाध्यक्ष सतीश कणसे, सदस्य ऋषिकेश वाडकर, दीपक म्हात्रे, राजू प्रसाद, सुधाकर निषाद, उमेश वाळंज, संजय काळेल, विकास मेटकरी, वरद आगलावे, विकास खैरनार, तसेच नवकला कृती फाऊंडेशनचे देवेंद्र केळुसकर,कौतुक निळकर, निलेश थळे, रीनेश गावित , राकेश जाधव आदि सदस्य व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. चहा पाण्याची व्यवस्था रायगड पोलिस विकास खैरनार यांनी केली.
गावात किंवा आजूबाजूला कचरा टाकू नये व कोरोनाचे नियम पाळून उत्सव साजरा करा. यामुळे रोगराई पूर्ण नष्ट होण्यास निश्चितच मदत होईल.
डॉ. राजाराम हुलवान, अध्यक्ष, माणुसकी प्रतिष्ठान