राज्यातील महाविद्यालये 15 नोव्हेंबरला- सामंत

। मुंबई । प्रतिनिधी ।
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातली सर्व शाळा महाविद्यालयं सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. 1 नोव्हेंबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालयं सुरू कऱण्याचा आमचा मानस असून त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत,असे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. ते म्हणाले, यावर्षी सीईटीला एकूण आठ लाख 55 हजार 869 विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची 197 केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून 226 केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा घेतली जाणार आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

Exit mobile version