वनवासी कल्याण आश्रम व कॅप्री फाऊंडेशनचा उपक्रम
। रसायनी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील वाशिवलीवाडी येथे वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र आणि कॅप्री फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 75 जनजाती बांधवांचे भव्य सामुदायिक विवाहसोहळा साजरा करण्यात आला. या विवाह सोहळ्याला रायगड जिल्ह्यातील 75 जनजाती समाजातील जोडपी उपस्थित होती.
वनवासी कल्याण आश्रम गेली 70 वर्षे जनजाती बांधवांच्या विविध समस्या ओळखून विविध प्रकल्प, उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन जनजाती बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी करत आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण जग कोव्हिड-19 शी संघर्ष करून जीवन जगत आहे. हीच बाब वनवासी कल्याण आश्रम आणि कॅप्री फाऊंडेशन यांनी विचारात घेऊन भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. 75 जोडपे अर्थात 150 वधू-वरांना पोशाखापासून ते कन्यादान, वर्हाडी मंडळींचे भोजन म्हणजेच विवाह सोहळ्याचा संपूर्ण आर्थिक खर्चाचा भार या दोन्ही संस्थांनी उचलला.
या सोहळ्यासाठी कॅप्री फाऊंडेशनचे ट्रस्टी रमेश चंद्र शर्मा, बेबी राऊका, नीता जोशी, राहुल रसाळ, कोकण प्रांत अध्यक्षा ठमा पवार, उपाध्यक्ष सोनूबाबा म्हसे, प्रांत संघटनमंत्री अमित साठे, कुलाबा जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे, सचिव रविंद्र पाटील, कोषाध्यक्ष मोहन मुजुमदार आणि अन्य स्वयंसेवी संस्थेचे अंशु अभिषेक तसेच इतर मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती. तसेच जिल्ह्यातील विविध जनजाती संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते देखील या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होत