फुले-आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी भीक मागितली

चंद्रकांत पाटलांच्या विधानाने गदारोळ
। औरंगाबाद । वृत्तसंस्था ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रातील महापुरूषांबद्दल मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. शाळा कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटीव यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

पुढे पाटील म्हणाले की, ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे.

Exit mobile version