अॅड.रणजित जाधव यांचे प्रतिपादन
| महाड | प्रतिनिधी |
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड किल्ल्यांच्या जोरावर स्वराज्याची उभारणी केली,असे प्रतिपादन नवयुग विद्यापीठाचे अध्यक्ष अॅड.रणजित जाधव यांनी केली. शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर संस्थेने आयोजित केलेल्या जागरगड किल्ल्यांचा मोहिमेअंतर्गत 50 किल्ल्यांची सफर या आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या रायगड येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की गडकिल्यांच्या जोरावर छत्रपतीनी स्वराज्य निर्माण केले, आपण भाग्यवंत आहोत जगदीश्वर मंदिराच्या आवारात बसून इतिहास समजून घेत आहात, बाबजाद्यांच्या जीवावर जगू नाका, गडकिल्यांच्या सानिध्यात जागा, त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल, तुमच्यावर संकट आली तर इतिहास आठवा, त्यातून आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
यावेळी सृष्टी फाउंडेशनचे सुखद राणे व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संस्थेचे सेक्रेटरी डॉ राहुल वारंगे यांना दुर्गमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी नरवीर युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल मालुसरे, अश्विनी जाधवराव,सुखद राणे, डॉ राहुल वारंगे, सेक्रेटरी ज्ञानेश्वर बावलेकर,रविन्द्र केसरकर,राजाराम केसरकर,नीलेश केसरकर आदि उपस्थित होते.
युवा पिढीने रंजकतेच्या पलीकडे जाऊन इतिहास बघितला पाहिजे आज तुम्ही मोहिमेच्या माध्यमातून इतिहास समजून घ्या, तसेच गडकिल्यांची रचना बघा, त्यांची बांधणी,रचना कश्या प्रकारे केले यावर लक्ष केंद्रित करून संवर्धनासाठी तयार व्हा, – अॅड.रणजित जाधव