अलिबागसह सर्वच किनार्यांवर पर्यटकांची गर्दी
प्रशासन सुद्धा थकले
अलिबाग | भारत रांजणकर |
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने राज्य सरकारच्या आदेशानुसार रविवारपासूनच रायगडात निर्बंध लागू करण्यात आले.मात्र,या निर्बंधांकडे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी ढुंकूनही पाहिले नाही.अलिबागचा समुद्रकिनारा रविवारीही पर्यटकांनी फुलून गेलेला होता.ना कोरोनाची धास्ती,फक्त दंगामस्ती असेच वातावरण किनार्यावर आढळून आले.यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या,मोठ्या व्यासायिकांना दिलासा मिळाला.अशीच स्थिती सर्वच पर्यटनस्थळी दिसून आली.
कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पर्यटनावर निर्बंध घातले आहे. तरीही अलिबाग समुद्र किनारी पर्यटकांनी गर्दी केली होती. काहींनी तर मास्क देखील लावले नव्हते.याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.