। महाड । प्रतिनिधी ।
गेल्या अकरा महिन्यांपासून महाड शहरात आलेल्या जुलै एकवीस च्या महाप्रलय याकरिता कारणीभूत असलेल्या सभेची नदीपात्रातील गाळ व खाजगी जुट्टे काढण्यासंदर्भात महाड पूर निवारण समिती मार्फत शासनाकडे करण्यात आलेल्या मागणीला गुरुवारी(12 मे) मोठे यश प्राप्त झाले असून पर्यावरणमंत्री ना आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे झालेल्या बैठकीला आ.भरत गोगावले, खा.सुनील तटकरे पालकमंत्री अदिती तटकरे यांसह पर्यावरण व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व पूर निवारण समितीसदस्य उपस्थित होते .
या संदर्भात पूर निवारण समितीच्या सदस्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाडवासीयांच्या असलेल्या या संदर्भातील मागण्या पुन्हा सभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या .यावेळी शासकीय अधिकारी तसेच ोगावले यांनी आपल्या याबाबतच्या भूमिका स्पष्ट केल्या. महाड वासीयांची मागील वर्षी झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेऊन पूर निवारण समितीचे सदस्य व शासकीय अधिकार्यांनी मांडलेल्या सविस्तर भूमिके अंती ना आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात नदीपात्रातील गाळ काढण्याकरिता आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देण्याची घोषणा करीत याबाबतची कायदेशीर औपचारिकता दोन दिवसांत पूर्ण केली जाईल असे स्पष्ट केल्याचे पूर निवारण समितीच्या सदस्यानी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मागील अकरा महिन्यांपासून महाडमधील महाप्रलय यासंदर्भात सुरू असलेल्या विविध स्तरांवरील शासकीय बैठकांमध्ये सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याचा मुद्दा ऐरणीवर होता.