। चिरनेर । वार्ताहर ।
भातशेती कापणीला आली असताना, चिरनेर, कळंबुसरे, दिघाटी, साई विभागातील भात खाचरातील शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू झाला झाला आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कळपाने पिकांवर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने, रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी चिरनेर येथील शेती कार्यशाळेचे कृषी मित्र प्रफुल्ल खारपाटील व शेती कार्यशाळेच्या शेतकरी वर्गातून होत आहे.
पिकलेल्या शेतीची नासाडी करण्यासाठी येणार्या रानडुकरांना पळवून लावण्यासाठी शेतकर्यांना रात्रभर शेतीची राखण करावी लागत आहे. परतीच्या पावसानेही जोरदार हजेरी लावल्याने, शेतात जे काही पिकले होते. त्या पिकांचेही नुकसान झाले असताना, पिकलेल्या भात शेतीची रानडुकरे नासाडी करू लागल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. nवन्यजीव संरक्षण कायद्याबाबत सतर्क राहणारे, वनविभागाचे अधिकारी प्रत्यक्षात या जंगली रानडुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत, त्यांना आळा बसेल अशी उपायोजना का करत नाही, अशी येथील शेतकर्यांची ओरड आहे