| श्रीवर्धन | वार्ताहर |
पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे श्रीवर्धन समुद्रकिनार्या वरती प्रेमी युगुलांचा वावर वाढला आहे. राऊत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या शाळेमध्ये असलेल्या गावातून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शिकण्यासाठी येतात. तालुक्यातील हरिहरेश्वर परिसरामध्ये जेवढी गावे आहेत त्या ठिकाणचे विद्यार्थी व विद्यार्थिनी या ठिकाणी येत असतात.
अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील त्या ठिकाणी फेरफटका मारत असल्याचे पाहायला मिळते. मात्र पोलिसांकडून त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. दुपारी साडेअकरा ते एक या वेळेमध्ये दामिनी पथक किंवा बीट मार्शल यांचा एखाद राउंड तरी समुद्रकिनार्यावरची व्हायला पाहिजे. जेणेकरून प्रेमीयुगुलांना आळा बसेल. अशी मागणी श्रीवर्धनमधील नागरिकांकडून केली जात आहे.