अवजड वाहतुकीवर कारवाईची मागणी

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

महाराष्ट्रातील अष्टविनायक तिर्थक्षेत्रांपैकी धार्मिक व प्रख्यात स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुधागड पाली शहराला एक ना अनेक समस्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे पालीकर नागरिक वर्षानुवर्षे त्रस्त आहेत. अशातच आता अवैद्य व अवजड वाहतूक सर्वात गंभीर समस्या बनली आहे. येथील अवैद्य व अतिक्षमतेने होत असलेली वाहतूक बंद व्हावी यासाठी मनसेनेच्या वतीने संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सदर निवेदन स्वीकारून निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन जलद कार्यवाही करण्याचे आश्‍वाशीत केले. यावेळी संदीप ठाकूर, जनार्दन पाटिल, भावेश बेलोसे, अजिंक्य पाशीलकर, दीपेश लहाने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version