राकेश टिकैत यांचा इशारा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीच्या सीमेवरून शेतकर्यांना हटवण्याचे काम केंद्र सरकराने सुरू केलं आहे. याचा विरोध करण्यासाठी शेतकर्यांनी पुन्हा कंबर कसली आहे. जबरदस्तीने शेतकर्यांना हटवण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारी कार्यालयांचे मंडईत रुपांतर करू, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.
दिल्लीतील गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवरील बॅरिकेड्स हटवून मार्ग पूर्णपणे खुला करण्यावरून शेतकरी नेते आणि पोलिस प्रशासन यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. या पाश्वर्र्भूमीवर राकेश टिकैत यांनी सरकारवर टीका केली आहे. टिकैत यांनी आपल्या पारंपारिक शैलीत पोलीस प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, शेतकर्यांना जबरदस्तीने हटवल्यास शासकीय कार्यालयांना धान्य मार्केट करू!
आंदोलक शेतकर्यांचे तंबू जेसीबीद्वारे हटवण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. असे केल्यास शेतकरी पोलीस ठाण्यात तंबू ठोकतील. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासून गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी शेतकरी तीनही कृषी कायद्यांविरोधात वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. नोव्हेंबरमध्ये दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवरील शेतकर्यांच्या आंदोलनाची वर्षपूर्ती होणार आहे.
शेतकर्यांनी रास्ता रोको केल्याने प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर शेतकरी नेते आणि युनायटेड किसान मोर्चाने आपल्या बाजूने रास्ता रोको केला नसल्याचे सातत्याने सांगितले सांगत आहेत. उलट पोलीस प्रशासनाने (दिल्ली पोलीस) बॅरिकेड्स लावून हे केले आहे, असं स्पष्टीकरण शेतकरी नेत्यांनी दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांचे जवान टिकरी सीमेवरून जेसीबी मशिनद्वारे नाकाबंदी हटवताना दिसले होते. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. रस्ते अनिश्चित काळासाठी बंद करता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत म्हटले आहे. मात्र, शेतकर्यांचा रस्ता रोको नसून प्रशासनाकडून करण्यात आल्याचेही न्यायालयात समोर आले.