वानखेडेना एकाकी पाडू नका

दिल्लीतील भाजप नेत्यांचे फर्मान
मुंबई | प्रतिनिधी |
महाविकास आघाडी सरकार असलेल्या राज्यात समीर वानखेडे यांना एकाकी पडू देऊ नका, असा आदेशच दिल्लीतील भाजप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्याचं विश्‍वसनीय वृत्त आहे. त्याबाबत व्यूहरचना तयार करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या घरी बैठका सुरु असल्याची माहिती मिळतेय. तसंच भाजपचे अनेक नेते सध्या वरळीत एक ठिकाणी असल्याचं कळतंय. पडद्यामागे राहून वानखेडेंना हवी ती मदत करा, सहकार्य देण्याची भूमिका घ्या, असा आदेश दिल्लीतील भाजप नेत्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुंबईत दाखल झाल्याचंही समजतं. त्याचबरोबर वानखेडेंना मदत करताना मविआतील नेत्यांवरील घोटाळ्यांच्या आरोपातून लोकांचं लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्लीतून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version