नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिवाळी जवळ आल्याने सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या बातम्या येत आहेत. या सणासुदीच्या काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती खाली येऊ शकतात. वास्तविक, केंद्र सरकार सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पूर्ण तयारीत आहे.
केंद्र सरकारने राज्यांना या सणासुदीच्या हंगामात आयात शुल्कात कपात केल्याचा लाभ तत्काळ ग्राहकांना देण्यास सांगितले आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील मूलभूत सीमाशुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने पाम तेल आणि सूर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्यूटी कमी केली आहे. त्यामुळे दिवाळीआधीच खाद्यतेलाचे भाव उतरण्याची शक्यता वाढली आहे.