आयपीएलमधले आठवे ‘विराट’ शतक

। बेंगळूरू । वृत्तसंस्था ।

आरसीबीची रन मशिन विराट कोहलीने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी करत आरसीबीला 20 षटकात 3 बाद 183 धावांपर्यंत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याने 67 चेंडूत शतकी खेळी केली. त्याचे स्ट्राईक रेट हे 156.94 इतके आहे.

विराट कोहलीचे हे शतक आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिले शतक ठरले तर वैयक्तिकरित्या त्याचे हे आयपीएलमधील आठवे शतक ठरले. विराट कोहली हा आयपीएल इतिहासात आठ शतके ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने आपल्या दमदार शतकानंतर थोडी अजब प्रतिक्रिया दिली. विराट कोहली म्हणाला की, मी आज आधीच काही ठरवून आलो नव्हतो. मला माहिती होतं की मी अती आक्रमकपणा दाखवू शतक नाही. मी गोलंदाजांना कायम हा कधी आक्रमक फटका खेळणार याचा अंदाज बांधायला भाग पाडलं.

अशा परिस्थितीत कसं खेळायचं याचा अनुभव आणि परिपक्वता यामुळे हे करता आलं. खेळपट्टीबाबत बोलायचं झालं तर जरी दव पडलं तरी खेळपट्टी खूप कोरडी आहे. त्यामुळे फलंदाजांना फलंदाजी करताना अडचणी येऊ शकतात. मी अश्‍विनविरूद्ध फटकेबाजी करू शकलो नाही. मी त्याचा चेंडू मिडविकेटला टोलवू शकलो नाही.

Exit mobile version