राज्यात 271 ग्रा.पं.च्या निवडणुका जाहीर

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्य निवडणूक आयोगानं 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. आयोगानं याबाबतचं परिपत्रक जारी केले आहे. या निवडणुकांसाठी 5 जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे. 4 ऑगस्ट मतदान, तर 5 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिना या ग्रामपंचायत हद्दीत रणधुमाळी गाजणार आहे.

निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगानं जिल्हाधिकार्‍यांना सांगितलेय. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.या निवडणुकीदरम्यान कोरोना नियमांचं पालन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्हावार निवडणुका
नाशिक – 40,धुळे – 52, जळगाव – 24,अहमदनगर – 15, पुणे – 19,सोलापूर – 25,सातारा – 10.सांगली – 1,औरंगाबाद 16, जालना – 28,बीड – 13,लातूर -9,उस्मनाबाद – 11,परभणी – 3

Exit mobile version