गवत विक्रीतून आदिवासींना रोजगार

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

आदिवासी बांधवांच्या हाताला कुठे काम मिळेनासे झाले की, पावसाळ्यात निर्माण झालेले गवत आदिवासी यांना रोजगार मिळून देत आहे. ग्रामीण भागात शेतजमीनशिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करुन रोजगार उपलब्ध होत असल्याचे चित्र सध्या तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. दरवर्षी पावसाळ्यात तयार होणाऱ्या गवतामुळे आदिवासी यांना रोजगारांचा प्रश्न सुटत असतो. सध्या गवताला मोठी मागणी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला निर्माण झालेले गवत आदिवासी कापून त्याची विक्री करीत आहेत. शहरातील मोठे तबेलेवाले व इतर व्यक्ती मोठ्या प्रमाणात गवताची खरेदी करत असून यातून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे.

आदिवासी समाज हा दुर्गम अशा डोंगराळ भागामध्ये राहत असतो. मात्र पावसाळ्यात या माळरान अथवा डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणावर गवत निर्माण होत असते. त्याच बरोबर ज्या शेतामध्ये लागवड केली नाही त्या ठिकाणी सुद्धा गवत निर्माण होत असते. यांची विक्री करून घरचे भागवणे सोपे जात आहे, असे मत आदिवासी बांधव यांनी व्यक्त केले.

Exit mobile version