माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा संपन्न

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1,"adjust":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

| कर्जत | वृत्‍तसंस्था |

अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेत सन 1981-82 साली इ. दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा पोतदार बंधु भगिनींच्या माणगांव वासरे येथील श्री मंगल मोरया फार्ममध्ये नुकताच संपन्न झाला.यावेळी माजी विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.

निसर्गाच्या सान्निध्यातील या फार्महाऊसच्या परिसरात सर्वांनी शालेय जीवनाप्रमाणे पावसाच्या जलधारांनी व धबधब्यावर न्हाऊन गाणी गातस्वादीष्ट नाश्ता, भोजन व सायंकाळी चहा, भजीचा आस्वाद घेत या स्नेहबंध मेळाव्याचा आनंद घेतला. ‘आठवण 82’ नावाने व्हॉट्सॲपवर सक्रिय असलेल्या व काही वर्षांनी हिरक महोत्सवी साठाव्या वर्षात प्रवेश करणा-या अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या गुरूजनांनी घडविलेल्या व संस्कारीत झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या या ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या शाळेच्या नविन वर्गखोलीच्या बांधकामासाठी दोन लाख एक्कावन्न हजाराची भरीव देणगी दिली होती.

बेलापुर येथील शाळेसाठी तीन सॉफ्टबोर्ड, शासकीय कृपा महिला वसतिगृहातील महिला व दोन मुलांना नविन कपडे व फराळ, जांभीवली येथील वनवासी कल्याण आश्रमाला दोन मोठ्या गॅस शेगड्या व विद्यार्थ्यांना फराळ वाटप, जि.प. शाळा शिरसे तसेच सांगवी शाळेला वॉटर प्युरिफायर तसेच तमनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने यापुढेही सामाजिक कार्य पुढे सुरू राहणार आहे असे या ग्रुपच्या सदस्या वर्षा पाठारे यांनी यावेळी सांगितले.

सांजवेळी सर्वांनी एका सुरात ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविद ना कहना’ हे गीत गात पुन्हा भेटू म्हणत एकमेकांचा निरोप घेतला या अत्यंत ह्रद्य अशा स्नेहबंध मेळाव्याला सुनिल भोपतराव, वर्षा देसाई, सुनिता देशमुख, असिफ मिर्झा, यशवंत चितळे, शुक्लेंदू जोशी, जयश्री संभूस, मंजुषा देव, निनाद आगाशे, पारस जैन, डॉ. राजस रेडकर, राजू पोतदार, राजेश कुळकर्णी, संदिप जोशी, संजय मालगुंडकर, शरद तुपे, वंदना लाड, कविता धर्माधिकारी, सिमंतिनी शिंदे, अनिल जोशी, पुरूषोत्तम वाणी, राजश्री बाम, सुजाता लाड, सविता चंदने, गुरुनाथ चव्हाण, गोविंद देवडा तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे दिनेश अडावदकर, विदेशातून सुनिल कुलकर्णी, समीरा मुल्ला उपस्थित होते.

Exit mobile version