शेकापची मागणी; तहसीलदारांना निवेदन
| माणगाव | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात दि.4 व 5 नोव्हेंबर रोजी वादळवार्यासह झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे माणगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. भातशेतीच्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी केली आहे. अशा आशयाचे निवेदन माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांना मंगळवारी देण्यात आले. यावेळी तालुका शेकापतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय पंदेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे व सहकारी कार्यकर्त्यांनी दिले. आपले हे निवेदन तातडीने शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी शेकाप कार्यकर्त्यांना दिले. यावेळी ज्येष्ठ नेते गोविंद पवार, सुरव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मधुकर अर्बन, सुरेश अर्बन, विलास मोरे, समीर सकपाळ, संजय गायकवाड, सुरेश पवार, वणी ग्रामपंचायतीचे सरपंच मोअज्जम बरामपुरे, पुरार ग्रामपंचायतीचे उपसरपंच रिझवान मुकादम, फलानी ग्रामपंचायतीचे सरपंच बळी मोरे, सिकंदर आंबोनकर, विजय मोरे, ईश्वर मोरे, नथुराम मोरे, महादेव शिर्के आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी कर्मचार्यांच्या संपाला शेकापचा पाठिंबा
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी, सवलती व वेतन लागू करण्यात यावे, या मागणीसाठी माणगाव आगारासह राज्यातील एसटी आगारातील कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाला माणगाव तालुका शेकापचा जाहीर पाठिंबा असल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी जाहीर केले. माणगाव एसटी आगारातील संपावर असलेल्या कर्मचार्यांची शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, कृउबा समिती सभापती संजय पंदेरे, तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे व सहकार्यांनी भेट घेऊन कर्मचार्यांची व्यथा ऐकून घेतली. तसेच संपूर्ण राज्यात एसटी कर्मचारी संपावर गेले असून, राज्य शासनाने कर्मचार्यांची दखल न घेतल्याने कर्मचार्यांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे.