गुरे चोरीमुळे शेतकरी चिंताग्रस्त

। पाताळगंगा । वार्ताहर ।
गेल्या काही वर्षात गुरे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. गुरे गोठ्यात बांधून ठेवलेली चोरून घेऊन जात असतात. तर चरण्यासाठी सोडलेली गुरे चोरुन नेली जात आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. वसंत बेंडू फाटे यांच्या गोठ्यात बांधलेली बैल, गाय आणि कालवड पहाटे तीन च्या सुमारास चोरीला गेल्याचा प्रकार चौक जवळ असलेल्या कोपरी गावात घडला आहे.
गाई, बैल तसेच म्हैस यांचा शेतीच्या कामासाठी मोठा उपयोग होत असतो. शेती व्यवसाय करणारे वसंत फाटे यांच्या चोरीला गेलेल्या गुरांमध्ये एक गाय गाभाण असल्याचे समजते. यासंदर्भात चौक येथिल पोलीस स्टेशनमध्ये गुरे चोरीला गेल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली असल्याचे वसंत फाटे यांच्या मुलाने सांगितले.

Exit mobile version