जंजिरा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुरुडमध्ये ध्वजारोहण

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुडमध्ये मंगळवारी (दि.31) जंजिरा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात आले. यानिमित्ताने यासाठी रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आझाद चौकात मुख्याधिकरी तथा प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

31 जानेवारी 1948 रोजी जंजिर्‍याच्या नवाबाने भारताच्या शामिल नाम्यावर सही केल्याने हे जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते. तेव्हापासून हा दिवस जंजिरा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुरुड, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात जंजिरा नवाबांची सत्ता होती. या तिन्ही तालुक्याचा कारभार नवाब सरकार मुरुड येथील राजवाड्यातून चालवत असत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिरा संस्थान सुद्धा भारतात विलीन व्हावे यासाठी आंदोलने झाली. याचाच परिणाम म्हणून नवाब भारतात विलीन व्हावे लागले होते.

मुरुड येथील आझाद चौकात झालेल्या कार्यक्रमास रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष मनोज खांबे, माजी अध्यक्ष मेघराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक मुर्तुझा शेख, मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस अजित कासार, माजी नगरसेवक प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, व्यापारी बँकेचे चेअरमन संदीप पाटील, श्रीराम बँकेचे चेरमन दिलीप जोशी, माजी तहसीलदार नयन कर्णिक ,पालिका प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, वसंतराव नाईक महाविद्यलयालयाचे उप प्राचार्य डॉक्टर विश्‍वास चव्हाण, मुख्याध्यापक सरोज राणे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, माजी नगरसेविका युगा ठाकूर, मुग्धा जोशी, वासंती उमरोटकर, समाजसेवक अरविंद गायकर, मुरुड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सिराज शेख, खजिनदार गणेश चोडणेकर, सह सचिव नितीन शेडगे, माजी अध्यक्ष संजय करडे त्याच प्रमाणे सर एस ए हायस्कूल जुनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अंजुमन इसलाम डिग्री महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी मराठवाडा स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच जंजिरा मुक्तीसंग्राम दिन ही शासकीय पातळीवर साजरा केला जावा, अशी मागणी सरकारकडे केली. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले.

मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी कार्यक्रम हा शासनाने शासकीय पद्धतीने साजरा करावा माझ्या शुभेच्छा आहेत त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळो. अशी सदिच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. तर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधवही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक, आभार संजय करडे यांनी केले.

Exit mobile version