चोरीच्या 23 दुचाकींसह चार आरोपींना अटक

एका गावातून चोरी, तर दुसऱ्या गावात विक्री

| वर्धा | वृत्तसंस्था |

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीची चोरी होत असल्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने पोलि‍सांकडे होत असलेल्या चोरीच्या तक्रारीमध्ये देखील वाढ झाली होती. परिणामी, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी सर्व पोलीस ठाणेदारांना दुचाकी चोरांना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. अशातच आर्वी पोलिसांनी एका दुचाकी चोरीचा तपास करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा शोध घेतला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षित बालकांना ही ताब्यात घेतले आहे. हे सर्व दुचाकी चोर वर्धा जिल्ह्यातून दुचाकी चोरून वाशिम जिल्ह्यात विक्री करत होते. या टोळीचा पर्दाफाश केल्याने शहरात समाधान व्यक्त करण्यात येत असून आता तरी दुचाकी चोरीवर अंकुश बसणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अशातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती आर्वी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकला मिळाली. यावरून पोलिसांनी सपाळा रचत नयन मिलिंद गायकवाड (19 रा. कोसूर्ला) याला दुचाकीसह अटक केलीय. संशयित आरोपीला अटक करत तपास केला असता संशयित आरोपीने वर्धा जिल्ह्याच्या आर्वी, सेवाग्राम, सावंगी, अल्लीपूर, खरागणा, सेलू येथील दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. दुचाकी चोरताना संशयित आरोपी नयन सोबत वर्ध्याच्या येसंबा येथील साहिल डोंगरे आणि दोन विधीसंघर्षित बालक मदत करत होते. हे सर्व दुचाकी चोरून वाशिम येथे जाऊन विक्री करत असल्याच समोर आले आहे.

पोलिसांनी पकडलेले हे दुचाकी चोरटे ज्या वाहनाना हॅण्डल लॉक नव्हते यांना पहिले टार्गेट करत होते. तर काही ठिकाणी यांनी हॅण्डल लॉक तोडून वाहने चोरून नेली आहे. दुचाकी चोरताना यांनी महागड्या दुचाकी सुद्धा चोरल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आर्वी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

Exit mobile version