। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात आणि देशात सर्वाधिक विकासाची क्षमता असलेल्या कोकणाकडे गेली 75 वर्षे दुर्लक्ष आणि अन्याय झाला आहे. यासाठी समृद्ध कोकण लोकचळवळीतर्फे स्वराज्यभूमी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी येत्या बुधवारी (दि.7) रत्नागिरीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आंबा बागायतदार व पारंपारिक मच्छीमार संपूर्ण कर्जमाफी, काजू बी व सुपारी हमीभाव, माकड व वन्य प्राणी नियंत्रण, शेतीबागायती, मत्स्योउद्योग आणि पर्यटन क्षेत्राकरिता दरवर्षी प्रत्येकी 1 हजार कोटीचा निधी द्यावा, निसर्गपूरक उद्योग सहज परवानग्या, कोकण विकास प्राधिकरण अंमलबजावणी, कोकण महामार्गाची पूर्तता येत्या निवडणुकीपूर्वी पूर्ण होऊन तसे शासन निर्णय निघावेत, या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.