। नवी मुंबई । वार्ताहर ।
हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील स्वतंत्र लढ्यातील काढलेल्या सत्याग्रह महाविद्यालयातील पदवीधारकांचा पदवीदान समारंभ संपन्न झाला. सत्याग्रह महाविद्यालयातील 250 मीडिया, व्यवस्थापन शास्त्र, संगणक, आयटी, हॉटेल व्यवस्थापन, शिक्षण शास्त्र, वाणिज्य, पाली भाषा पदवीधारकांना माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध मराठी साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पदवीदान करण्यात आले.
पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून शेकापचे आ.बाळाराम पाटील, डॉ.अशोक बहिरट, प्रा.एम.व्ही.तिगोटे, राम करावकर, रत्नमाला डोंगरगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे संस्थापक प्रा.डॉ.जी.के.डोंगरगावकर यांनी राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचा गेली 40 वर्षाचा अहवाल मांडला. पदवीदान समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा.एस.व्ही.जाधव होते. त्यांनी संस्थेचे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचे सांगितले.
यावेळी नोकरीबरोबरच समाजामध्ये समाजकार्य आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीत कार्यरत कर्मचार्याचा सन्मान आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन प्रा संगीता जोगदंड, स्वागत प्रा.ललिता यशवंते, प्रा.नेहा राणे, प्रा.वनिता सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.