महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार नाहीः शरद पवार

| सातारा | वृत्तसंस्था |

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र आजच्या निकलाचा परिणाम 2024 मध्ये होणार नाही. महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. ते साताऱ्यात बोलत होते. सध्या तरी मोदींना अनुकुल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील पवार म्हणाले.

निकालांचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही. भाजपला अनुकूल ट्रेण्ड सध्या दिसतोय हे मान्य केले पाहिजे. मंगळवारी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. राज्यातील जाणकारांकडून माहिती घ्यायची आहे. खरी माहिती येत नाही, तोपर्यंत मतदान यंत्रांना दोष देता येणार नाही. बीआरएसने स्वत:च्या राज्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांना पराभावाला सामोरे जावे लागणार आहे. राहुल गांधीच्या सभेचा चांगला परिणाम झाला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. नवीन लोकांना संधी द्यावी असा मतदारांचा कल दिसत आहे. दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर या विषयी बोलणार आहे, असेही पवार म्हणाले.

मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे. आरक्षण देत असताना दुसऱ्याच्या ताटातील देता कामा नये, अशी सर्वांची भुमिका होती. आरक्षणासाठी जनगणना होणे आवश्यक आहे. इतरांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा आरक्षणामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, नुकसान, दुष्काळ याकडे दुर्लक्ष होतय हे खरे आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने लक्ष घातले पाहिजेत, असे देखील शरद पवार म्हणाले.

Exit mobile version