। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्यापासून येथील विमानसेवेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अलायन्स एअरचे सिंधुदुर्ग व्यवस्थापक समीर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते म्हणाले की, ङ्गङ्घसिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन झाल्याच्या दुसर्या दिवसापासूनच या विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र मुंबईला जाताना प्रवासी कधीकधी उशिराने येत असल्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. यामुळे विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार तपासणीसाठी प्रवाशांनी विमानतळावर विमान सुटण्याच्या दोन तास अगोदर उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे या विमानतळावरून मुंबईला जाणार्या सर्व प्रवाशांनी या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे.