। अलिबाग । प्रतिनिधी ।
काही काळ विश्रांती घेतल्यानंतर परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांसह अलिबागला झोडपून काढले. गुरुवारी (दि.13) सकाळी ऊन पडले होते. त्यामुळे छत्री, रेनकोट न घेताच बाहेर पडलेल्या नागरिकांची परतीच्या पावसाने चांगलीच तारांबळ उडविली. विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पडणार्या पावसामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले.
सध्या राज्यभरात ठिकठिकाणी परतीचा पाऊस कोसळत असून अलिबागमध्ये गेले 3 ते 4 दिवस ऊन व ढगाळ असे वातावरण दिसून येत आहे.