आ. बाळाराम पाटील यांचे आवाहन
। रेवदंडा । वार्ताहर ।
गतवर्षी उरण येथे कोरोना कालावधीत वर्धापनदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, परंतु येत्या 2 ऑगस्टला वडखळ येथील वर्धापनदिनी शेकापक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याने नवचैतन्य जागवा असा संदेश देत, लाल बावटा घराघरावर, गाड्यांवर फडकवा, असे आवाहन आ. बाळाराम पाटील यांनी केले.
बोर्ली येथे मुरूड तालुका शेकापक्षाचे वतीने शेकापच्या 2 ऑगस्ट वर्धापनदिनाच्या पूर्वतयारी व नियोजनाबाबतची मार्गदर्शन सभा रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी आ. बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, रायगड बाजार चेअरमन नृपाल पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, रायगड जिल्हा पुरोगामी युवक संघ अध्यक्ष देवा पाटील, तालुका चिटणीस खालापूर संतोष जंगम, जिल्हा कार्यकारणी सदस्य किशोर हजारे, दीपक कांबळी, मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत, विजय गिदी, सहचिटणीस सी.एम. ठाकूर, माजी जि.प. सदस्य वामन चुनेकर, माजी सभापती रमेश नांगावकर, नीता गिदी, मुरूड तालुका अल्पसंख्याक सेल अध्यक्ष रिझवान फहीम, बोर्ली सरपंच डॉ. चेतन जावसेन, उसरोली सरपंच मनिष नांदगावकर, मुरूड तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष शरद चवरकर, माजी सरपंच काकळघर संतोष कांबळी, साळाव ग्रा.पं. माजी उपसरपंच मधुकर पाटील, मनोहर भोपी आदी मान्यवरांसह मुरूड शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेश नांदगावकर यांनी केले.
यावेळी सुरेश खैरे, अॅड. आस्वाद पाटील यांनी मुरूड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वर्धापनदिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे त्यांनी आवाहन केले. शेवटी बोर्ली ग्रामपंचायत सरपंच डॉ. चेतन जावसेन उपस्थितांचे आभार मानले.