भयंकर! पती आवडत नाही म्हणून लग्नानंतर 21 दिवसांत केली हत्या

पती आवडत नसल्याने लग्नानंतर 21 दिवसात पत्नीकडून पतीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 8 नोव्हेंबर रोजी गेवराईमधील पांडुरंग चव्हाण यांची हत्या झाली होती.

हत्येनंतर पांडुरंग यांच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयावरून त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी सुरू केली. अखेर आज संशयित पत्नीने पोलिसांना आपणच पांडुरंग यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. शीतल चव्हाण असे संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे. गेवराई पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाच्या 21 दिवसानंतरच एका तरुणाचा गळा दाबून खून झाल्याचा प्रकार बीडच्या गेवराईमध्ये मागच्या आठवड्यात उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी पांडुरंग चव्हाण या मयत तरुणाच्या पत्नीला ताब्यात घेतले होते आणि तिची चौकशी केल्यानंतर पांडुरंगची पत्नी शीतलनेच त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

एका महिन्यापूर्वी शीतल आणि पांडुरंग यांचा विवाह झाला होता. मात्र शीतल आपल्या पतीपासून खुश नसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या पतीचाच गळा दाबून हत्या केली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी शीतलवर पांडुरंग चव्हाण यांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version