कर्ज योजनांसाठी सहकारी बँकांचा समावेश करा

प्रवीण काकडे व अमोल गावडे यांची मागणी

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजना, व्याज परतावा योजना, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुरू आहेत. या योजनांचा फायदा मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकाची आवश्यकता आहे. मात्र, अनेक अडचणींमुळे राष्ट्रीयकृत बँकेत अशी कर्ज प्रकरणे मंजूर होत नाहीत. त्यामुळे या योजनांचा लाभ मिळण्यासाठी यामध्ये नागरी सहकारी बँकांचा समावेश करावा, अशी मागणी मंत्री अतुल सावे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे प्रवीण काकडे व अमोल गावडे यांनी केली आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास प्रतिवर्षी भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो; परंतु, तो निधी सर्वसामान्य, भटक्या व जमातींना त्याचा लाभ मिळत नसल्याने तो निधी प्रतिवर्षी परत जातो. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळांमधील असलेला धनगर समाज व इतर भटक्या जमाती गेली 75 वर्षे पूर्ण होऊनही समाजात त्याचा लाभ झाला नाही. तरी तो होणं खूप गरजेचे आहे. विविध जाती जमातीसाठी महामंडळ निर्माण केली असून परंतु खर्‍या अर्थाने जेवढी आश्‍वासने दिली आहेत, तेवढी प्रकरणे मंजूर करण्यात येत नाहीत व अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नोकरीचासुद्धा प्रश्‍न खूप मोठ्या प्रमाणात गंभीर आहे. त्यामुळे राज्याने ज्या काही विविध जाती जमातीची युवा उद्योजकांच्या बाबतीमध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत, त्याबाबत राष्ट्रीय बँकांमध्ये अडवणूक केली जाते. त्यामुळे नागरिक सहकारी बँकांचा समावेश करून नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी संधी निधी उपलब्ध होतील व बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version