| नवी दिल्ली | वृत्तसस्था |
केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली. महागाई भत्त्यात तब्बल 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय कर्मचार्यांचे महागाई भत्त्याचे तीन हफ्ते प्रलंबित आहेत. सरकारने करोनामुळे महागाई भत्त्याला स्थगिती दिल्यानं हे हफ्ते प्रलंबित असून, सप्टेंबरपासून कर्मचार्यांच्या हातात घसघशीत पगार येणार आहे.