पूरग्रस्तांना मिळणार वाढीव मदत

2019 प्रमाणे मदतीची घोषणा
राज्य सरकारकडून निर्णय जाहीर
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील पूरग्रस्तांना 2019 सालच्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना मागील महिन्यात महापुराचा फटका बसला होता.कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. अनेक भाग पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारकडून नुकसान भरपाईसाठी पंचनामेही करण्यात आले आहेत. आता राज्यातील अतिवृष्टीबाधितांना 2019 सालच्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तथापी, अद्यापही केंद्र शासनाने 2015 नंतर नुकसान भरपाईच्या दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने केंद्राच्या दरापेक्षा जास्तीच्या दराने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम 2019 सालच्या महापुरात देण्यात आलेल्या दराप्रमाणे आहे. त्यामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
2019 साली अशी मदत
छोट्या दुकानदारांना 50 हजार रुपये
जनावरांचे नुकसान 20 हजार रुपय
5 हजार रोखीने 10 हजार बँक खात्यामध्ये जमा

Exit mobile version