भारत, ऑस्ट्रेलिया खेळणार अंतिम सामना?

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे येत्या 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. आता अवधे दोन दिवस राहिलेल्या या स्पर्धेबद्दल क्रिकेट वर्तुळात मोठ्याप्रमाणात चर्चा होत आहे. अनेक आजी-माजी दिग्गजांनी या स्पर्धेबद्दल विविध मतं देखील मांडली आहेत. आता काही दिग्गज क्रिकेटपटूंनी अंतिम सामन्यापर्यंत कोणते दोन संघ पोहचू शकतात, याबाबत अंदाज वर्तवले आहेत. यातील बर्‍याच खेळाडूंनी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना होईल, असे अंदाज व्यक्त केले आहेत. तसेच, जवळपास सर्वच माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचेल, असे अंदाज व्यक्त केले आहेत. तसेच, सुनील गावसकर, ब्रायन लारा, पॉल कॉलिंगवूड, ख्रिस मॉरिस, मॅथ्यु हेडन आणि एस श्रीसंत यांनी ही भारत ऑस्ट्रेलिया अंतिम सामना खेळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Exit mobile version