। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताने अखेरच्या साखळी लढतीत शुक्रवारी बांगलादेशकडून 0-1 अशी हार पत्करली. परंतु तरीही सरस गोलफरकाच्या आधारे कुमारी सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
भारताने ( 11) बांगलादेश ( 3) संघापेक्षा सरस गोलफरक राखला. या स्पर्धेतील सर्वाधिक गोल नोंदवणार्या खेळाडूंचा आणि सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार लिंडा कोमने पटकावले. तिने एकूण पाच गोल झळकावले.
या सामन्यात पाचव्या मिनिटाला शुभांगीने गोल करण्याचा केलेला प्रयत्ना बांगलादेशची गोलरक्षक रुपनाने हाणून पाडला. मग 40व्या मिनिटाला नितूने केलेला प्रयत्नही रुपनाच्या कौशल्यामुळे अपयशी ठरला.
दुसर्या सत्रात भारताचे मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनर्बी यांनी शुभांगीच्या जागी पूनमला मैदानावर आणले. 60व्या मिनिटाला भारताची कर्णधार शिल्की देवीने लांबवरून गोल साकारण्याचा केलेला प्रयत्नही अयशस्वी ठरला. मार्टिना आणि सुनीता यांच्या जागी निकीता आणि अमिशा यांना बदली करण्यात आले. बांगलादेशने मग आक्रमणाची धार वाढवली. सामन्याच्या 74व्या मिनिटाला प्रियांकाने साकारलेला गोल हा बांगलादेशसाठी निर्णायक ठरला.