काबूल | वृत्तसंस्था |
अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने भारताबरोबरची आयात आणि निर्यात दोन्ही बंद केली आहे. अशरफ गनी सरकारच्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध खूप सौहार्दपूर्ण निर्माण झाले होते. भारताने अफगाणिस्तानातील अनेक विकास प्रकल्पांना प्राधान्य देत विकासाला चालना दिली होती. पण आता पूर्वीसारखेच संबंध टिकून राहण्याची फारशी आशा नाही.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे डॉ. अजय सहाय यांनी आयात-निर्यातीवर तालिबानी बंदीला दुजोरा दिला आहे.
भारत अफगाणिस्तानचा मोठा भागीदार आहे
डॉ. अजय सहाय यांनी सांगितले की, भारत व्यापाराच्याबाबतीत अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार आहे. 2021 मध्येच आपली निर्यात 835 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती, तर आयात 510 दशलक्ष डॉलर होती. आयात-निर्यात व्यतिरिक्त, भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे, ज्यात सुमारे 400 योजनांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक समाविष्ट आहे.