पाण्या अभावी उद्योग संकटात

| पनवेल | वार्ताहर ।

एमआईडीसी कडून होत असलेल्या अपुर्‍या पाणी पुरवठ्या मुळे तळोजा उद्योगिक वसाहती मधील उद्योग संकटात सापडले आहेत. दैनंदिन उपयोगाला साठी लागणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेकदा कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवावी लागत असल्याने अडचणीत आलेल्या कारखानदारांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कारखानदारांची संघटना असलेल्या तळोजा इंडस्ट्रीयलिस्ट असोशियन तर्फे करण्यात आली आहे.

जवळपास साडेनऊशे लहान मोठे कारखाने असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात येतो. बारवी धरनातील पाण्याचा वापर या करिता करण्यात येतो. मागील काही दिवसात बारवाई धरणातील हे पाणी तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांना न पुरवता पनवेल पालिका क्षेत्र तसेच सिडको वसाहती मधील सदनिका धारकांना पुरवले जात असल्याने पाण्या अभावी औद्योगिक वसाहती मधील कारखानदारांची स्थिती गंभीर झाली आहे. मागील 3 आठवड्या पासून सुरु असलेल्या या पाणी टंचाई मुळे कारखान्यातील कामगारांना पिण्यायोग्य पाणी देखील मिळणे अवघड झाल्याने विकतचे पाणी आणि कामगारांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागत आहे. तर कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवता यावी या करिता टँकरचे पाणी मागवावे लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भुर्दंडाचा भार कारखानदारांवर पडत असल्याचे मत तळोजा इंडस्ट्रियलिष्ट असोशियन चे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी दिली आहे.

पाणी टंचाई मुळे अनेक कारखान्यानमधील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवावी लागत आहे. मात्र या कालावधील कामावर असणार्‍या कामगारांचे वेतन सुरूच ठेवावे लागत असल्याने अगोदरच अडचणीत असलेले कारखानदार आणखी अडचणीत सापडण्याची भीती कारखानदारांकडून व्यक्त केली जात आहेत.

Exit mobile version