दीपक दळवींवर शाई हल्ला

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर एका महामेळाव्यात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकून हल्ला केला आहे. या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदवत, कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी जनतेवर अत्याचार करत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकार्‍यांनी केला.
या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने उद्या म्हणजे मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
गेली 64 वर्षे बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषक शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी लढा देत आहेत. तरीही सीमावासिकांच्या नेत्यांवर अशाप्रकारे हल्ला करणे दुर्देवी आहे. आता तरी महाराष्ट्राने आणि महाराष्ट्र शासनाने प्रखरपणे आवाज उठवला पाहिजे; अन्यथा त्यांचे सीमाभागा विषयी काहीच देणे घेणे उरले नाही असे समजून आम्ही आमच्या मार्गाला लागू, असा निर्वाणीचा इशाराही शेळके यांनी दिला आहे.

Exit mobile version