। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होणार्या अन्याय, अत्याचाराविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. कर्नाटक शासन मराठी भाषिकांना सापत्नपणाची वागणूक देत असल्याचा मराठी भाषिकांकडून करण्यात आला आहे.
या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नसल्याचे सांगत चोहोबाजूंनी बॅरिकेटेड लावले होते. कर्नाटक शासनाकडून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषकांवर पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्याने खडाजंगी उडाली होती.
बेळगाव महापालिकेसमोर लावलेला अनधिकृत लाल पिवळा झेंडा हटवण्यात यावा, मराठी भाषेतून शासन आदेश प्रसिद्ध व्हावेत, फलक लावले जावेत आदी मागण्यांसाठी धर्मवीर संभाजी चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलकांनी मोर्चाचा निर्धार कायम ठेवत ङ्गबेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मराठी भाषकांना हक्क मिळालेच पाहिजे,फ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समितीचे शुभम शेळके, मदन बामणे, रेणू किल्लेदार यांच्यासह युवक, महिलांचा मोर्चात मोठा समावेश होता.