| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत शहरातून वाहणार्या उल्हास नदीवर गणेश घाट नंबर एक व घाट नंबर दोन या दोन घाटांची नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे.
31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन आहे, दीड दिवसाच्या गणरायाचे दुसर्या दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर रोजी विसर्जन असल्याने शहरातून वाहणार्या उल्हास नदीवर पाणी अडवण्यासाठी झडपा बसवण्यात आल्या आहेत. नगर परिषदेने नदीवरील सर्व घाटावरील गवत काढून साफसफाई केली आहे. घाटावर लाईटची सुविधा करण्यात आली आहे. या सगळ्या पूर्वतयारीची पाहणी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगर परिषदेचे अभियंता मनिष गायकवाड, सुदाम म्हसे, सुनील लाड, उल्हास नदी स्वच्छता अभियानचे समीर सोहनी यांनी केली.