दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन

| रायगड | खास प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील वाशीवली, जावळी या दोन ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रामसेवक व सरपंच यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतींमधील विविध रजिस्टर्स, फॉर्मस, दस्तऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, स्वच्छतागृह बांधणे, गावात साफसफाई असणे, गावात व्यायामशाळा, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, ग्रामसभेत नियमित विषयांवर चर्चा, गावात वृक्षारोपण करणे यासह इतर शासकीय योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी व्ही.एन.टेक्नो. रिसर्च प्रा.लि. या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version