मयुरेश पाटील विज्ञान शाखेत प्रथम तर मानसी म्हात्रे आर्टस शाखेत प्रथम
अध्यक्ष, अॅड. गौतम पाटील यांचे हस्ते गौरव
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दि. ८ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने जाहीर केलेल्या १२ वी परिक्षेच्या निकालात येथील जे. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९४.९४ टक्के एवढा लागला आहे. आज महाविद्यालयात १२ वी उत्तीर्ण विद्याथ्र्यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. विज्ञान शाखेतून मयुरेश पाटील हा विद्यार्थी ८७.८३% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तर प्रित माळी हा विद्यार्थी ८२.५०% गुण मिळवून द्वितिय व अर्णव फड हा ८१.६७% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. प्रणव प्रविण पाटील (७९. १७%) व मेहता बॉबी (७५.६७%) हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेतून मानसी म्हात्रे ही ७१.५०% गण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून किरण म्हात्रे ( ७०.६७% ) व करण शेळके ( ६९.८३%) हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अॅड. गौतम पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाचा योग्य तो चांगला पर्याय पुढील शिक्षणासाठी निवडा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्राचार्य डॉ अनिल पाटील यानी उपस्थित पालक व विद्यार्थ्याचे स्वागत करून प्रास्तविक केले. पुढील शिक्षणासाठी कोणतेही सहाकार्य, मार्गदर्शन आवश्यक असल्यास ते महाविद्यालयातून उपलब्ध होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पालकांतर्फे ज्ञानेश्वर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा त्वरीत सत्कार आयोजीत केल्याबद्दल समाधान व्यक्त केले व व्यवस्थापनाचे व प्राचार्य व शिक्षक वर्गाचे आभार मानले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. एन. एन. शेरे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. एस. ए.कानडे, प्रा. ए. आर. मेहेंदळे, प्रा. डॉ. निनल पाटील,अजय सावंत, मिलींद धोदरे, प्रविण पाटील, प्रबंधक, जी. के. गिते व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. जे. एस. एम. मधून १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दि. १० जून २०२२ ते २० जून २०२२ या कालावधीत ‘इन-हाऊस’ कोटयामधून पदवीच्या प्रथम वर्षात थेट प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी यावेळी दिली.